• Sun. Oct 19th, 2025

भाजपचा लोकसभा निवडणुकित ४०० पार नारा नंतर आता विधानसभेसाठी २०० पारचा नारा 



भाजपचा लोकसभा निवडणुकित ४०० पार नारा नंतर आता विधानसभेसाठी २०० पारचा नारा 

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – लोकसभा निवडणुकीत झालेली चूक लक्षात आली आहे. ती चूक विधानसभेला होणार नाही, असे सांगत आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला २०० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास चंद्रशेखर बावनकळे यांनी व्यक्त केला आहे. भाजपचे पुण्यात रविवारी झालेल्या प्रदेश महाअधिवेशनात चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत ६० जागा अल्पमतांनी गमवाव्या लागल्याचे सांगून चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, की मंत्रालयावर भगवा फडकावयाचा आहे. प्रत्येक बूथवर दहा मतांची गरज आहे. अधिवेशनातून बाहेर पडल्यानंतर प्रत्येकाने दहा ते पंचवीस मतदार वाढवा. नव्याने मतदार नोंदणी करा. मला काय मिळेल, याचा विचार न करता जागा वाटपाचा निर्णय महायुतीत होईल. राज्यातील १४ कोटी जनतेला देण्यासाठी काम करा. माझा विश्वास आणि श्रद्धा तुमच्यावर आहे. तुम्ही हे कराल आणि महायुती २०० चा आकडा पार करेल. ही घमेंड नाही तर विश्वास आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें